जाहिरातींसाठी तत्त्वे विकणारी माध्यमं आणि बाबासाहेबांची तत्वाला धरून चालणारी पत्रकारिता (Media selling principles for advertising and journalism that follows Babasaheb's principles)
वृत्तसेवा :- आजच्या डिजिटल आणि व्यावसायिक माध्यमांच्या काळात, जिथे वृत्तपत्रे आणि न्यूज चॅनेल्स प्रामुख्याने पब्लिक रिलेशन्स PR (पीआर) आणि 'डू एडिटोरियल' सारख्या छुप्या जाहिरातींवर अवलंबून राहिल्या आहेत, तिथे Babasaheb Ambedkar's Journalism Principles डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अटल आणि तत्त्वनिष्ठ पत्रकारितेची आठवण ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत राजू परुळेकर यांनी करून दिली आहे. सध्याच्या माध्यमांच्या अवस्थेवर तीव्र टीका करताना बाबासाहेबांच्या आदर्शाचा उल्लेख त्यांनी केला. परुळेकर म्हणतात, “आजची माध्यमे फक्त PR पीआरसाठी काम करतात. वृत्तपत्र म्हणून ओळखले जाणारे संस्थान अस्तित्वातच नाही. व्यावसायिक वृत्तपत्रे बाजूला ठेवा, ती सुरुवातीला व्यवसायासाठी होतीच. पण आता तर ती केवळ जाहिराती आणि प्रायोजित कंटेंटच्या माध्यमातून चालतात.” त्यांनी 'डू एडिटोरियल'चा उल्लेख करत सांगितले की, एखाद्या एडिटोरियलमध्ये दिसणारी सामग्री वाचून लगेच समजते की ही जाहिरात आहे, पण ती जाहिरात म्हणून ओळखली जात नाही आणि त्यासाठी वेगळे शुल्क घेतले जाते. “आता मी अशा माध्यमांना वृत्तपत्र म्हणायला धाडस करत नाही,” असे ते स्पष्टपणे म्हणाले.
या पार्श्वभूमीवर परुळेकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचे उदाहरण दिले. बाबासाहेबांनी 'मूकनायक' (१९२०), 'बहिष्कृत भारत', 'जनता' आणि 'प्रबुद्ध भारत'सारखी वृत्तपत्रे सुरू केली. त्यांच्या या माध्यमांनी दलित आणि शोषित समाजाच्या आवाजाला बळ दिले, पण बाबासाहेबांनी कधीही समाजाला हानिकारक किंवा तत्त्वांशी विसंगत जाहिराती स्वीकारल्या नाहीत. “ते म्हणायचे, जाहिराती फक्त तत्त्वज्ञानाशी जुळणाऱ्या घ्याव्यात; अन्यथा वृत्तपत्र बंद पडले तरी चालेल,” असे परुळेकर सांगतात. बाबासाहेबांच्या या भूमिकेमुळे त्यांची वृत्तपत्रे आर्थिक संकटात सापडली, कर्जात बुडाली, तरीही त्यांनी तडजोड केली नाही. कोलंबिया युनिव्हर्सिटीतील एक पारशी मित्र आणि गोदरेज यांच्या मदतीने ते चालवली गेली, पण तत्त्वांशी विश्वासघात केला नाही. त्या काळात नखे लावण्यापासून लेख छापण्यापर्यंत सर्व काही हाताने करावे लागे. डिजिटलायझेशन नव्हते. तरीही बाबासाहेबांनी आपली भूमिका सोडली नाही. ही तडजोड न करण्याची वृत्ती, ही लढाईची वृत्ती, ही क्रांतिकारी वृत्ती आहे,” असे परुळेकर म्हणाले. त्यांनी हेही नमूद केले की, आजच्या काळात ही क्रांतिकारी वृत्ती पूर्णपणे हरवली आहे. “लोक प्रयत्न न करता आनंदी झाले आहेत, ही भयानक गोष्ट आहे.” परुळेकर यांनी बाबासाहेबांना फक्त व्यक्ती न मानता “एक अवस्था” (state) म्हणून सादर केले. “जसे गौतम बुद्ध हे बुद्धत्वाचे राज्य आहे, तसे डॉ. बाबासाहेब आता एक आदर्श अवस्था आहेत. पण लोक त्या दिशेने जाण्याचा प्रयत्नही दाखवत नाहीत.” १३२व्या जयंतीनिमित्त (किंवा त्यांच्या पत्रकारितेच्या संदर्भात) हे बोलताना त्यांनी शोषित समाजाला सजग राहून लढा देण्याचे आवाहन केले. परुळेकर यांनी माध्यमांच्या नैतिक पतनावर आणि समाजातील क्रांतीकारक वृत्तीच्या अभावावर गंभीर चिंता व्यक्त केली. माध्यमांच्या वर्तमान अवस्थेची समीक्षा नाही, तर बाबासाहेबांच्या तत्त्वनिष्ठ पत्रकारितेच्या प्रकाशात आजच्या समाजाला आणि पत्रकारांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारी आहे. जेव्हा माध्यमे तथ्य आणि तत्त्वांपेक्षा व्यावसायिक हितसंबंधांना प्राधान्य देतात, तेव्हा बाबासाहेबांसारख्या आदर्शांची आठवण अधिक महत्त्वाची ठरते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या