बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे भारतीय सैन्याच्या विविध विभागात निवड झालेल्या कार्तिक हरिचंद्र मोहुर्ले, सारंग संजय खामणकर, भारत मुकुंदा ढुमने, विक्रम बबन गोरे, रामसिंग आझादसिंग बावरे, या 5 अग्निविरांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विचार मंचावर प्रभारी प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण, प्रा. स्वप्नील बोबडे, ले. योगेश टेकाडे यांची उपस्थिती होती. यावेळी आपल्या प्रस्ताविकेतून भूमिका मांडताना प्रा. ले. योगेश टेकाडे यांनी मागील 5 वर्षात महाविद्यालयातील 38 कॅडट भारतीय सैन्यात व इतर सुरक्षा विभागात सेवा देत असून ही आपल्या साठी अभिमानाची बाब आहे एनसीसी ही विद्यार्थ्यामध्ये शिस्तीसोबतच एक आदर्श नागरिक घडविण्याचे महत्वाचे माध्यम होय
यावेळी प्रा. स्वप्नील बोबडे यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना यशाबद्दल शुभेच्छा दिल्या तसेच कवितेच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी आपल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना डॉ. चव्हाण सर म्हणालेत कि " विद्यार्थ्यांनी एनसीसी सोबतच महाविद्यालयातील इतर उपक्रमासोबत ज्ञान संपादन करण्यात भर द्यावा. त्यामुळं विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते असे मत व्यक्त केले या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या वरिष्ठ व कनिष्ठ विभागाचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments