प्रा. डॉ. श्याम मानव यांचे बल्लारपूरात व्याख्यान, पहिल्या राज्यस्तरीय पुरोगामी साहित्य संमेलन 24 फरवरी ला होणार कार्यक्रमाची जय्यत तयारी...! (Prof. Dr. Shyam Manav's lecture in Ballarpur, successful preparations for the program of the first state level progressive literature conference on February 24...!)
जिल्हा चंद्रपूर येथे भरगच्च कार्यक्रम पार पडणार आहे. सकाळी ९:०० वाजता कार्यक्रमाचे उदघाट्न प्रख्यात विचारवंत प्रा.शाम मानव यांच्या हस्ते होईल.संमेलनाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक मा.शिवा इंगोले (मुंबई), हे या संमेलनाला लाभले आहेत.विशेष अतिथी- मा.निता चापले मॅडम(राष्ट्रीय माजी महिला क्रिकेटर,लेखिका,तथा समाजिक कार्यकर्ता)मुंबई.
प्रमुख उपस्थिती-मा.विजय सूर्यवंशी रायगड. (संस्स्थापक अध्यक्ष,पुरोगामी पत्रकार संघ,भारत), मा.बाळासाहेब आटांगळे,मुंबई. (राष्ट्रीय कार्याध्यक्ष,पुरोगामी पत्रकार संघ) मा.संतोष जाधव, नाशिक(राज्य अध्यक्ष,पुरोगामी पत्रकार संघ,भारत) मा.निलेश ठाकरे(राज्य सचिव,(पुरोगामी पत्रकार संघ,भारत) तर स्वागताध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक प्रब्रम्हानंद मडावी हे भूमिका बजावणार आहेत. स्वागत गीत - कु.स्नेहल शिरसाट, सूत्रसंचालन - मा.सिमा भसारकर, तर या साहित्य संमेलनाची प्रस्तावना एड. योगिता रायपूरे मांडणार आहेत.
प्रा.इसादास भडके.यांच्या अध्यक्षतेत कवी संमेलनाचे आयोजन केले आहे.या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कवी, गीतकार खेमराज भोयर करतील तर डॉ.प्रभाकर लोंढे(गोंदिया), विजया भगत(चंद्रपूर), जयंत साठे(नागपूर), मधुकर पळसगावकर, डाँ.शुभांगी भोयर, अनघा मेश्राम (नागपूर) शाहिदा शेख(चंद्रपूर), विजय सूर्यवंशी(जळगाव), सिद्धार्थ मेश्राम(नागपूर), सुरेखा बेंद्रे(संभाजी नगर) नागेश वाहुरवाघ(नागपूर), हृदय चक्रधर(नागपूर), शालिक जिल्हेकर(नागपूर) किशोर मुघल(चंद्रपूर) यांचा या कवी संमेलनात सहभाग असणार आहे.याचे संयोजन तथा आभार प्रसिध्द कवयित्री ज्योती चन्ने करतील. दुपारी २:०० वाजता प्रसिद्ध वक्ता, पुरोगामी विचारवंत प्रा.जावेद पाशा सर (नागपूर) हे 'शिवकालीन मुस्लिम मावळ्यांची भूमिका आणी बादशाह बहादूरशाह जफर यांच्या पर्यंतचा प्रवास' या विषयावर वख्यान करतील.या वाख्यानाचे संयोजन तथा आभार विचारवंत तथा प्रसिद्ध वक्त्या डॉ.अभिलाषा गावतुरे करतील. दुपारी ३:०० वाजता विलास थोरात (अमरावती) यांचा "हल्ला बोल" हा एकपात्री प्रयोग सादर करण्यात येणार आहे. सायंकाळी -४:०० वाजता उठाव साहित्य मंच मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली विद्रोही कवी संमेलन होणार आहे. या कवी संमेलनाचे सूत्र संचालन-प्रसिध्द आंबेडकरी कवी बबन सरवदे (मुबंई), करतील. तर रमेश भवार (मुंबई), सुरेश जगताप (मुंबई), गजानन गावंडे(मुंबई), विशाल उशिरे(मुंबई) या प्रसिद्ध साहित्यिक कवींचा यात सहभाग असणार आहे. सायकाळी 5:00 वाजता माजी राष्ट्रीय महिला क्रिकेटर, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या तथा मार्गदर्शक निता चापले(मुंबई) यांची प्रगट मुलाखत पुरोगामी साहित्य संसदेच्या विदर्भ अध्यक्षा एड.योगिता रायपूरे, साहित्य संसद चे राज्य अध्यक्ष नरेंद्र सोनारकर घेतील.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या