अजयपूर नजिक झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटूंबियांना प्रत्येकी ५ लाखाची आर्थीक मदत जाहीर
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांची घोषणा.
चंद्रपूर :- चंद्रपूर-मुल महामार्गावर अजयपूर येथे झालेल्या डिझेल टॅंकर व लाकडाने भरलेला ट्रक यांच्यात झालेल्या भिषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ९ जणांच्या कुटूंबियांना प्रत्येकी ५ लाख रूपये अर्थसहाय्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन देण्याची मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती. आ. मुनगंटीवार यांच्या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री निधीतुन मृतकांच्या कुटूंबियांना प्रत्येकी ५ लाख रूपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे. अजयपूर गावाजवळ झालेल्या भिषण अपघातादरम्यान मोठी आग लावून ९ मजूरांना भाजून मृत्यु झाला होता. या अपघातानंतर आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून मुख्यमंत्री निधीतुन मृतकांच्या कुटूंबियांना ५ लाख रूपये अर्थसहाय्य देण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे यांच्याशी याबाबत त्यांनी चर्चा देखील केली. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठविण्याची विनंती केली. आ. मुनगंटीवार यांच्या मागणीची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मृतकांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन प्रत्येकी ५ लाख रूपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केलेली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या