नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम' अर्थात राष्ट्रीय स्वच्छ वायू सर्वेक्षण अंतर्गत महाराष्ट्रातील 19 शहराचा समावेश, चंद्रपूर 15 व्या तर नागपूर 18 व्या स्थानी (Among the 19 cities in Maharashtra under the National Clean Air Programme', i.e. National Clean Air Survey, Chandrapur is 15th and Nagpur is 18th.)

Vidyanshnewslive
By -
0
नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम' अर्थात राष्ट्रीय स्वच्छ वायू सर्वेक्षण अंतर्गत महाराष्ट्रातील 19 शहराचा समावेश, चंद्रपूर 15 व्या तर नागपूर 18 व्या स्थानी (Among the 19 cities in Maharashtra under the National Clean Air Programme', i.e. National Clean Air Survey, Chandrapur is 15th and Nagpur is 18th.)
चंद्रपूर :- केंद्रीय पर्यावरण, वने आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने केंद्रीय प्रदूषण नियंण मंडळाच्या माध्यमातून २०१९ पासून 'नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम' अर्थात राष्ट्रीय स्वच्छ वायू सर्वेक्षण सुरू केले आहे. केंद्रीय पर्यावरण, वने आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून हे अभियान सुरू केले आहे. याद्वारे वायू प्रदूषणात आघाडीवर असलेल्या शहरांना वायू प्रदूषण कमी करण्यासाठी काही सूचना करण्यात आल्या होत्या. तसेच यादरम्यान वायू प्रदूषणात उत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांना बक्षिसे देण्यात येणार होते. नुकतेच केंद्रीय पर्यावरण, वने आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२३ चे पुरस्कार जाहीर केले आहे.  
यात वायू प्रदूषणात आघाडीवर असलेली देशातील १३१ आणि महाराष्ट्रातील १९ शहरे समाविष्ट करण्यात आली आहेत. या शहरांना २०२४ पर्यंत २० ते ३० टक्के सूक्ष्म धूलिकण कमी करण्याचे ध्येय देण्यात आले आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी चांगले कार्य करणाऱ्या शहरांना पुरस्कृत करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात मोठ्या शहरांतील वर्गवारीत ठाणे तिसऱ्या क्रमांकावर असून मध्यम शहराच्या वर्गवारीत अमरावतीने पहिला क्रमांक प्राप्त केला आहे. विदर्भातील चंद्रपूर १५ व्या तर नागपूर १८ व्या क्रमांकावर आहे. राज्यात वायू प्रदूषणाबाबत उत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांमध्ये अमरावती प्रथम, ठाणे तृतीय, नवी मुंबई आठव्या, मुंबई दहाव्या तर सर्वसाधारण प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये चंद्रपूर पंधराव्या, लातूर सतराव्या, नागपूर सतराव्या स्थानी आहे. वाईट कामगिरी करणाऱ्या शहरांमध्ये नाशिक २१, पुणे २९, वसई विरार ३२, औरगांबाद ४०, सोलापूर १९, कोल्हापूर २३, बदलापूर ३०, उल्हासनगर ३१, अकोला ३२, जळगाव ३३, सांगली ३५ आणि जालना ३६ व्या क्रमांकावर आहे. हे सर्व पुरस्कार उत्कृष्ट घनकचरा, जैविक कचरा व्यवस्थापन आणि कचरा ज्वलन रोखणे, रस्त्यावरील धूलिकणाचे नियंत्रण, बांधकामावरील धूलिकणाचे नियंत्रण लक्षात घेऊन हे पुरस्कार देण्यात आले आहे, अशी माहिती स्काय वाॅच ग्रुपचे सुरेश चोपणे यांनी दिली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)