बल्लारपूर -: रेल्वे सुरक्षा दलाच्या तत्परतेमुळे एका प्रवाशाला त्याचे हरवलेले सामान सापडले. प्रवाशाने आरपीएफ पथक, भारतीय रेल्वे आणि १३९ हेल्पलाईन पथकाचे मनःपूर्वक आभार मानले. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, बल्लारपूर शहरातील पेपर मिलमध्ये काम करणारे शैलेंद्र आर्य हे १८/०७/२०२६ रोजी आपल्या कुटुंबासोबत बल्लारशाहहून गोंदियाला १२७७१ क्रमांकाच्या रायपूर एक्सप्रेसने प्रवास करत होते. ट्रेन दुपारी १२ वाजता गोंदिया स्टेशनवर पोहोचली आणि घरी पोहोचल्यावर त्यांच्या लक्षात आले की त्यांची एक बॅग ट्रेनमध्येच राहिली आहे. त्यांनी तात्काळ १३९ हेल्पलाईनवर फोन करून बॅग हरवल्याची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्याच्या एका तासाच्या आत, त्यांना १३९ हेल्पलाइन वरून फोन आला की, राजनांदगाव स्टेशनवर आरपीएफ टीमने त्यांचे सामान सुरक्षितपणे ताब्यात घेतले आहे. त्यांनी राजनांदगावला जाऊन आरपीएफ स्टेशनवरून आपले सामान घ्यावे. प्रवासी शैलेंद्र आर्य रविवारी सकाळी ११ वाजता राजनांदगाव आरपीएफ स्टेशनवर पोहोचले आणि त्यांनी आपले सामान घेतले. त्यांनी आरपीएफ टीम, भारतीय रेल्वे आणि १३९ हेल्पलाइन यांचे मनःपूर्वक आभार मानले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या