दुसरे राज्यस्तरीय कवी संमेलन उत्साहात; महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून कवींचा सहभाग, साहित्यिक व मान्यवरांची उपस्थिती
वर्धा -: साहित्य, काव्य आणि सामाजिक जाणिवांचा सुरेख संगम घडविणारे दुसरे राज्यस्तरीय कवी संमेलन व ‘प्रबोधिनी कविरत्न पुरस्कार–२०२६’ सोहळा रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी वर्धा येथे उत्साहपूर्ण आणि साहित्यिक वातावरणात पार पडला. प्रबोधिनी प्रेरणा फाऊंडेशन, प्रबोधिनी मंच व महाराष्ट्र साहित्य समूह यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. संत गाडगेबाबा स्मारक व सभागृह, कृष्णनगर, वर्धा येथे या भव्य साहित्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक तसेच विदर्भ साहित्य संघ, वर्धा शाखेचे अध्यक्ष राजेंद्र मुंढे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषद वर्धाचे अध्यक्ष सुधीर पांगुळ, माजी स्किल डेव्हलपमेंट अँकर सुरेश गणराज, ज्येष्ठ कविवर्य भालचंद्र डंभे, सामाजिक कार्यकर्त्या अर्चना भोमले, ॲड. मृणालिनी रागीट, प्रबोधिनी प्रेरणा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत रामटेके, प्रबोधिनी मंचच्या सचिव रंजना आटे तसेच ॲड. विठ्ठल लोणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कवितांच्या सादरीकरणाने रंगला साहित्यिक दरबार भरला
संमेलनात महाराष्ट्राच्या विविध भागांतून सहभागी झालेल्या कवी-कवयित्रींनी आपल्या दर्जेदार कविता सादर करत रसिकांची दाद मिळविली. अमरावती, वाशिम, मोर्शी, आरमोरी, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, लातूर, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नागपूर आणि वर्धा आदी जिल्ह्यांतील साहित्यिक व कवींच्या सहभागामुळे संमेलनाला व्यापक राज्यस्तरीय स्वरूप प्राप्त झाले. विजया वसंत लेवटे, पुष्पा दिलीप अतकरे, डॉ. किरण प्रभाकर वाघमारे, वृषाली दिनेश चोरे, सुनिता तागवान, अनिल अमरसिंग जाधव, सुनंदा मधुकर अंभोरे, आरती महेंद्र गायकवाड, मंदाताई सुरेश वाघमारे, चंदू डोंगरवार, डॉ. किरणताई नामदेवराव मोरे-चव्हाण, रोहित बन्सोड, रवि ताकसांडे, संतोष ग्यानीराम मेश्राम, क्षितिजा बापट, गंगाधर शालिग्राम धुवाधपारे यांच्यासह अनेक कवी-कवयित्रींनी कविता सादर केल्या. तसेच भंडारा, नागपूर व वर्धा जिल्ह्यातील उषा शिलवंत घोडेस्वार, मंगला डहाके, मेघा भांडारकर, कविता कठाणे, हर्षा उद्धव भुरे, प्रा. जयश्री प्रकाश वाघ, राधिका कैलास तितीरमारे, उषाताई राऊत, शुभांगी कपिल डांगरे, हर्षा हरीश वाघमारे, प्राजक्ता नितीन वऱ्होकर, कोकिळा सुनील खोदनकर, मुकेश मुकिंद वानखेडे, डॉ. ज्योती जे. नागपूरकर, मनिषा गुरनुले, जिजा प्रदीप मानकर, अरुणा भास्कर भोंडे, डॉ. राजेश चंद्रकांत काळे, सुचिता गोपाळराव कुनघटकर, निलेश वासुदेव गणगे, प्रीती वानखेडे, सरला अजय कापसे, नैना सचिन ठाकरे, निलिमा शंकर मोहमारे, ॲड. विठ्ठलराव लोणकर आणि सुरेश लक्ष्मण सुरजुसे आदींनीही सहभाग नोंदविला. कविता सादरीकरणासोबत सहभागी कवी-कवयित्रींचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या साहित्यिक योगदानाला व्यासपीठ देत प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले.
साहित्याच्या माध्यमातून समाजाशी नाते दृढ करण्याचा प्रयत्न अध्यक्षीय मार्गदर्शनातून राजेंद्र मुंढे यांनी काव्य व साहित्याची सामाजिक भूमिका अधोरेखित केली. साहित्य हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून समाजातील संवेदना, प्रश्न आणि परिवर्तनाची जाणीव व्यक्त करणारे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंजना आटे यांनी केले. सूत्रसंचालन रवी ताकसांडे व हर्षा भुरे यांनी प्रभावीपणे केले, तर आभार ॲड. विठ्ठल लोणकर यांनी मानले. या संपूर्ण साहित्य सोहळ्याचे मुख्य आयोजन प्रबोधिनी प्रेरणा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत ताराचंद रामटेके आणि प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूहाच्या संस्थापिका अध्यक्षा नम्रता प्रशांत रामटेके यांच्या पुढाकारातून करण्यात आले. कार्यक्रमाच्या नियोजनात सचिव रंजना आटे व ॲड. विठ्ठल लोणकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विविध जिल्ह्यांतून आलेल्या कवी-कवयित्रींच्या उपस्थितीने आणि दर्जेदार कविता सादरीकरणाने वर्ध्यातील हा साहित्यिक सोहळा संस्मरणीय ठरला. नवोदित आणि प्रस्थापित साहित्यिकांना एकत्र आणत काव्यप्रतिभेला व्यासपीठ देणारा ‘प्रबोधिनी कविरत्न पुरस्कार–२०२६’ उपक्रम साहित्यविश्वात सकारात्मक पाऊल ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या