दिवसेंदिवस वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरातही 3 तास वाहतूक दिवे बंद राहतील

Vidyanshnewslive
By -
0

दिवसेंदिवस वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरातही 3 तास वाहतूक दिवे बंद राहतील 


चंद्रपूर :- नागपूर प्रमाणे आता चंद्रपुरात देखील दुपारी 3 तास सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलीसांनी घेतला आहे. उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद होत आहे. प्रामुख्याने चंद्रपुरात मागील काही दिवसांमध्ये सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे. चंद्रपुरात मागील काही दिवसातील सर्वाधिक 46.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. या वाढत्या उष्णतेमूळे आता नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाच्या तडाख्यापासून वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना दिलासा मिळावा यासाठी चंद्रपूर वाहतूक पोलिसांच्या वतीने शहरातील चौकांमधील सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सूर्य आग ओकत असल्याने दुचाकीस्वार दुपारच्यावेळी सिग्नलवर थांबल्यावर त्याला उष्णतेचा अधिक त्रास होतो. हाच त्रास वाचण्यासाठी आता चंद्रपूर शहरात दुपारी 1 ते 4 या वेळेत सिग्नल बंद असणार आहेत. वाहतूक पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी सामनासोबत बोलताना ही माहिती दिली. येत्या काही दिवसांमध्ये हे उच्चांकी तापमान असेच राहणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता शहरात दुचाकीस्वारांना प्रवास करताना काहीसा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे वाहतूक विभागाने घेतलेल्या या निर्णयाचा सर्वसामान्य जनतेने स्वागतचं केले आहे.

संपादक -: दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)