" ईव्हीएम हटावं, लोकशाही बचाव " च्या मागणी साठी बल्लारपूरात भव्य जनआक्रोश मोर्चा (Mass protest march in Ballarpur demanding "Remove EVMs, Save democracy".)
बल्लारपूर :- बल्लारपूर शहर व तालुक्यात " आम्ही भारताचे लोक व समस्त बल्लारपूर शहरवासी च्या विद्यमान येत्या 6 मार्च ला बल्लारपूर शहरातील नवीन नगर परिषद(काटा गेट) दादाभाई नवरोजी वार्ड ते तहसील कार्यालय बल्लारपूर पर्यंत ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव या मागणी साठी भव्य जनआक्रोश मोर्चा चे आयोजन करण्यात आले असून या अनुषंगाने बल्लारपूर शहर व तालुक्यात जनजागृती मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असून सदर जनआक्रोश मोर्चा बुधवार दि. 6 मार्च 2024 ला सकाळी 11:00 वाजता सुरुवात होणार असून यासोबत प्रमुख मागण्या म्हणून
1) EVM मशिन बंद करून मतदान बॅलेट पेपरवर झालेच पाहिजे.
2) शेतकऱ्यांच्या शेतमालाला स्वामीनाथन आयोगानुसार हमी भाव मिळालाच पाहिजे.
3) जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे.
4) देशातील सर्व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यात यावे.
5) देशातील आरोग्य व्यवस्थेमध्ये सुधारणा करून लोकांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात यावी.
6) शिक्षणाचे खाजगीकरण व व्यापारीकरण संदर्भातील सर्व शासन निर्णय तसेच नवीन शैक्षणिक धोरण तात्काळ रद्द करण्यात यावे.
7) युवा बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांना स्वाभिमानाने जीवन जगण्याची सुविधा करण्यात यावी.
8) चंद्रपूर जिल्ह्यामधील वाढत्या प्रदूषणाच्या दुष्परिणाम वर तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात जेणेकरून नागरिकांच्या आरोग्याच्या समस्येचे निराकरण होईल. ई प्रमुख मागण्या करण्यात येत असून या मोर्चात अधिकाधिक संख्यने सहभागी होण्याचं आव्हान " आम्ही भारताचे लोक " या संघटनेचे द्वारे करण्यात आले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments