साखरपुड्याला जात असतांना कुटुंबियांवर काळाचा आघात : चारचाकी वाहनाला अपघात ४ घटनास्थळी ठार तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

Vidyanshnewslive
By -
0

साखरपुड्याला जात असतांना कुटुंबियांवर काळाचा आघात : चारचाकी वाहनाला अपघात ४ घटनास्थळी ठार तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

वृत्तसेवा :- अमरावती शहरातील रहाटगाव रिंगरोडवर ट्रक व तवेरा कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी असून सर्वांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ओव्हरटेकच्या नादात हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ट्रक अमरावतीवरून नागपूरच्या दिशेकडे जात होता तर तवेरा कार अमरावतीवरून वलगावकडे जात होती. तवेरा वाहनातील मृतक व जखमी हे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी येथील रहिवासी आहेत. तर तवेरामधील लोक हे वलगाव येथे साक्षगंध सोहळ्याला जात असल्याची माहिती आहे. अमरावती शहरातील रहाटगाव रिंगरोडवर तवेरा गाडी पोहोचली असता ट्रकला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात तवेरा कारचा चक्काचूर झाला. कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला तर एका गंभीर जखमीला रुग्णालयात दाखल करत असता मृत्यू झाला. या अपघातात ५ जण जखमी झाले आहे. जखमींवर अमरावतीच्या खासगी रुग्णालयात उपचार असून रुग्णालयात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जाऊन नातेवाईकांची भेट घेऊन विचारपूस केली. वाहन चालक व मालक रोशन रमेश आखरे, (२६ रा.अंजनगाव बारी), प्रतिभा सुरेश पोकळे (वय ५०  रा.अंजनगाव बारी ) कृष्णा अतुल घाडगे, (वय ८), गजानन दारोकर (वय ४५ राहणार जरुड) अशी मृतांची नावं आहे. तर विजय भाऊराव पोकळे (वय ५५ रा. अंजनगाव बारी), ललिता विजय पोकळे (वय ५० अंजनगाव बारी), सुभाष भाऊराव पोकडे (वय ६०, रा. अंजनगाव बारी), सुरेश भाऊराव पोकळे (वय ५८, रा. अंजनगाव बारी),  संगीता गजानन दारोकार (वय ३५ राहणार जरुड), रश्मी सचिन गाडगे (वय ३० रा शिरजगाव कसबा) जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)